ठाणे-पालघरच्या कुपोषित बालकांसाठी राज्य सरकारचा नवीन उपक्रम

Netive News Portal
Sep 3, 2018 · 2 min read
ठाणे-पालघरच्या कुपोषित बालकांसाठी राज्य सरकारचा नवीन उपक्रम

राज्यातील कुपोषित बालकांची संख्या लक्षात घेता आदिवासी तालुक्यांमधील आदिवासींच्या सक्षमीकरणासाठी आदिवासी विभागाच्या वतीने ‘कम्युनिटी अॅक्शन फॉर न्युट्रिशन’ या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली आहे. राज्यभर राबविण्यात येणाऱ्या या योजनेमध्ये ठाणे, पालघरमधील तीन जिल्ह्यांचा समावेश आहे. ठाण्यातील शहापूर येथील ४० गावांचा यात समावेश असून वननिकेतन संस्थेच्या माध्यमातून या तालुक्यात काम केले जाणार आहे. तर, पालघर जिल्ह्यातील जव्हार आणि मोखाडा तालुक्यांमधील प्रत्येकी ४० अशा ८० गावांचा समावेश करण्यात आला आहे. कामगार व मजूर संघ संस्थेच्या माध्यमातून या गावात कामे केली जाणार आहेत. कुपोषित बालकांची संख्या कमी करण्यासह गावांमध्ये लोकसहभागातून विविध उपक्रम राबविण्याची जबाबदारी या कार्यक्रमाअंतर्गत पार पाडली जाणार आहे.

राज्य सरकारने आदिवासी भागांमधील कुपषोणाचा प्रश्न सोडविण्यासाठी विविध योजना राबवण्याची घोषणा केली आहे. राज्यभर राबविल्या जाणाऱ्या या उपक्रमांमध्ये ठाणे-पालघर जिल्ह्यातील गावांचा समावेश करण्यात आला आहे. पोषण व आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासह त्यांची माहिती संकलित करण्याची जबाबदारी या माध्यमातून काम करणाऱ्या संस्थांवर सोपविण्यात आली आहे.गावपातळीवर सहा वर्षांखालील बालके, गरोदर महिला, स्तनदा माता यांना दिल्या जाणाऱ्या पोषण व आरोग्यसेवांची सद्यस्थिती, कुपोषित बालकांच्या पाठपुराव्याची माहिती गोळा केली जाणार आहे. त्यानंतर त्यामध्ये समिती सदस्यांच्या निरीक्षणातून बदल करून या भागात सुधारणा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे.

कुपोषण सक्षमीकरणाच्या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे या माध्यमातून या भागातील सर्व माहिती दर महिन्याला मोबाइल अॅप माध्यमातून एकत्रित करण्यात येणार आहे. गावपातळीवर सहा वर्षांखालील बालके, गरोदर महिला, स्तनदा माता यांना दिल्या जाणाऱ्या पोषण व आरोग्यसेवांची सद्यस्थिती, कुपोषित बालकांच्या पाठपुराव्याची माहिती गोळा केली जाणार आहे. त्यानंतर त्यामध्ये समिती सदस्यांच्या निरीक्षणातून बदल करून या भागात सुधारणा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. या भागातील गंभीर कुपोषित व मध्यम कुपोषित बालकांची संख्या घेऊन त्यांना या कुपोषणातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. आशा, अंगणवाडी सेविका व आरोग्य सेविकांचा समन्वय घडवून त्यातून सार्वजनिक आरोग्य अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न या संस्थांमधून केला जाणार आहे.

अन्य जिल्ह्यांमध्ये योजना…

गडचिरोली, नंदुरबार, नाशिक, रायगड आणि पुणे जिल्ह्यांमध्येही ही योजना राबविण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील ४० गावांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. प्रत्येक तालुक्यासाठी एक संस्था नियुक्त करण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून ही योजना राबविली जाईल. राज्य शासनाच्या आदिवासी विभागाने या संदर्भातील निर्णय घोषित केला आहे.

marathi.netive.in

In the midst of fake news, non-issues and propaganda content, we young libertarians commit ourselves to guide the masses towards the factual information.

Netive News Portal

Written by

marathi.netive.in

In the midst of fake news, non-issues and propaganda content, we young libertarians commit ourselves to guide the masses towards the factual information.

Welcome to a place where words matter. On Medium, smart voices and original ideas take center stage - with no ads in sight. Watch
Follow all the topics you care about, and we’ll deliver the best stories for you to your homepage and inbox. Explore
Get unlimited access to the best stories on Medium — and support writers while you’re at it. Just $5/month. Upgrade